नकळत अलगत वळणावर,
नकळत अलगत वळणावर,
ती नजर भेट होते.
असे अबोल प्रेम हे,
बहरावं बंद कप्प्यात.
स्वप्नातील ती भेट,
प्रकटावी सत्यात.
असे प्रेम मोहरुन यावे,
वसंताच्या बहरात.
गूज बोलणे घडावे,
नजरेच्या मिलनात.
सांज होता पक्षी ही,
येती माघारी घरट्यात.
किलबिल जागी होई,
सुंदर साजिर्या खोप्यात.
गूज पानात जाईच्या,
बोल बोलती मंजुळ.
रंग उधळीत सृष्टी,
दाखवते नवे रुप.
तुझं पाहता सखया,
मन बेधुंद झाले.
आठवणींचा हिंदोळा,
उचंबळे काळजात.
सांज होता मावळती,
रविराजा जातो अस्ती,
उंच माळावर बहरावी आपली अबोल प्रीती.
……. ……. ……
,